
मुंबई : कंत्राटी भरतीची सुरुवात व त्याला मान्यता देणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्यातील युवकांची माफी मागावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचे, आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे युवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. कंत्राटी भरतीसाठी नियुक्त झालेल्या ९ कंपन्या या मागच्या सरकारच्या काळात नियुक्त झाल्या, असेही त्यांनी सांगितले. कंत्राटी भरतीवर उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादीने माफी मागावी नाहीतर आम्हला विरोधकांचे पाप जनतेसमोर उघड करावे लागेल, असा इशारा फडणवीसांनी दिला.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















