काँग्रेसचे पाकिस्तान वर पुन्हा दिसले प्रेम

0

नवी दिल्ली(New Delhi), 10 मे  काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असून त्यांना फार अपमानित करू नका असा इशारा केंद्र सरकारला दिला. यावरून भाजप नेत्यांनी अय्यर यांच्यावर टीका केलीय. अय्यर यांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम अधोरेखीत झाल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

यासंदर्भात ठाकूर म्हणाले की, मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामधून काँग्रेसच्या मनातील भीती आणि दहशत दिसत आहे. हे विधान म्हणजे काँग्रेसचं पाकिस्तान प्रेम आहे. काँग्रेसचे नेते राहतात भारतात पण त्यांच्या मनात मात्र पाकिस्तान भरलेला आहे. पाकिस्तानमध्ये आता काही दम राहिलेला नाही. पाकिस्तानला कसं सरळ करायचं, हे भारताला माहिती आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

तर भाजप नेते गिरीराज सिंह म्हणाले की, पाकिस्तानने जर काही आगळीक केलीच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मणिशंकर अय्यर यांच्या बेताल वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. अय्यर हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ही काँग्रेसची दुतोंडी मंडळी आहे. आज भारत शक्तिशाली आहे. तसेच जर पाकिस्ताननं डोळे वटारण्याचा प्रयत्न केलाच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. सध्या कांग्रेसचे लोक दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत, अशी टीका गिरिराज सिंह यांनी केली.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या निवडणुकीत राहुल गांधी यांची विचारसरणी पूर्णपणे उघड झाली आहे. पाकिस्तानचं समर्थक करा, दहशतवाद्यांशी संबंधित संघटनांचं समर्थन करा. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि लूट करा, हेच काँग्रेसचे धोरण आहे, असा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी केला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा