संजय राऊत यांचं सरकारला आव्हान ; ‘त्या’ डायरीतील नावे कुणाची?
मुंबई. ठाकरे गटाने (Thackeray gat) ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येचा (builder Suraj Parmar suicide case ) मुद्दा लावून धरला आहे. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government ) धारेवर धरले आहे. सूरज परमार यांची डायरी सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. ही नावे कुणाची आहेत हे आम्हाला माहीत आहे. हिंमत असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावा, असे आव्हानच संजय राऊत यांनी सरकारला दिले आहे. प्रसार माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हे आव्हान दिले. काल अरविंद सावंत यांनी हा विषय मांडला. ठाण्यातीरल बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर एक डायरी सापडली आहे. त्या डायरीत जी काही सांकेतिक नावे आहेत. कुणाची आहेत आम्हाला माहीत आहेत. लावा याची एसआयटी, या शब्दात त्यांनी दम भरला.
सूरज परमारच्या डायरीवर एसआयटी लावकार का?, एसआयटी फक्त आमच्यावर होते. इतके सूडबुद्धीने वागणारे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात आले नव्हते, असा हल्ला राऊत यांनी चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीत जातात. त्यावरूनही राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. शिंद-फडणवीस यांचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे त्यांना वारंवार दिल्लीत जावे लागत असेल. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख तिकडे आहेत. ते जातील. त्यांना तिथूनच आदेश घ्यावे लागतात, असा चिमटा त्यांनी काढला.
दिशा सालियन प्रकरण इंटरपोलकडे जरी दिले तरी हरकत नाही. ज्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही ते महाराष्ट्रच्या विधानसभेत का काढले जातायत?, असा सवाल त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अपमानावरून महाराष्ट्र पेटलेला आहे. त्याचे पडसाद सभागृहात उमटणार होते. पण त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच अनावश्यक मुद्दे काढले जात आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.