Home MAHARASHTRA  अवकाळी पावसाचा धान उत्पादकांना सर्वाधिक फटका

 अवकाळी पावसाचा धान उत्पादकांना सर्वाधिक फटका

0

गोंदिया(Gondia), ०८ मे  गोंदिया जिल्ह्यामध्ये काल आलेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला असून शेतामध्ये उभे असलेले धानपिक व कापून झालेल्या धानपिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर मळणी केलेला धान देखील कालच्या पावसाने ओला झाला असल्याने त्याला वाळविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत तर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाची आलेला घास हिरावला गेल्याने शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.