
प्रा सुरेश चोपणे
——————————–
चंद्रपूर ते नागपूर ला जाण्यासाठी तयार केलेला रस्ता आणि रस्ता ओळखण्यासाठी बांधलेले दगडी आणि विटांचे खांब हे ब्रिटिश किंवा गोंड राजांनी बांधलेले नसून चंद्रपूर ते नागपूर येथे जाण्या येण्यासाठी भोसले राजानी बांधले आहेत अशी माहिती अभ्यासा नंतर प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली आहे.
ह्यातील बहुतेक रस्ते खांब तुटले असले तर ताडोबात मात्र अशी खांब सुरक्षित राहिली आहेत. चंद्रपूर ते ताडोबा तलावा पर्यंत ते वाळूच्या दगडा पासून बनविली असून पुढे नागपूर साठी काही खांब विटा पासून बनविली आहेत.खांबाच्या वर यू आकाराचे दगड मांडलेले आहेत.हे दगड पुढील खाबाकडे दिशा दाखविण्यासाठी विशेषता तयार केली असून क्वचित प्रसंगी वन्यजीव सुरक्षे साठी दोरी आणि घंटा बांधण्या साठी उपयोग केल्या जात असावा.अशी माहिती प्रा सुरेश चोपणे ह्यांनी गोंड, ब्रिटिश आणि भोसले काळाचा अभ्यास , संशोधन केल्या नंतर दिली आहे.
ब्रिटिश प्रत्येक बांधकामाची बिले,माहिती लिहून ठेवत असे,ह्या खाबाची माहिती चंद्रपूर गॅझेटियर मध्ये किंवा आर्थिक अहवालात प्रकाशित झालेली नाही.ताडोबाच्या काही वेबसाईटवर गोंड कालीन खांब असल्याचे अनेक पर्यटन संस्थांनी अंदाचे म्हटले आहे. परंतु सर्व राजांचा शास्त्र शुद्ध अभ्यास केल्यानंतर चंद्रपूर ते नागपूर येथे जाण्यासाठी भोसले ह्यांनी हे खांब बांधल्याचे पुरावे प्रा सुरेश चोपणे ह्यांना मिळालेले आहेत.
खांबाचा आराखडा
हे खांब भोसले राजांनी ( १७५१- १८५३) चंद्रपूर ला येण्या जाण्यासाठी बांधले होते.चंद्रपूर – ताडोबा – चिमूर – उमरेड – नागपूर असा हा प्रवास असायचा. दाट जंगलात १०० मीटर अंतरावर असे खांब बांधले जायचे.पूर्वी शेकडो खांब बांधले गेले परंतु ताडोबात ती ३५ दगडांची आणि ९ विटांची उपलब्ध आहे.उमरेड जवळ एक आढळली परंतु नागपूर कडील अनेक पडली आहेत.आज उपलब्ध असली तरी त्यात विटानी बांधलेली सुद्धा आहेत.परंतु पुढे ती तुटली ,पडली आणि नष्ट झाली.त्यांची उंची जवळ जवळ १५ फूट आणि खाली जाड जवळ जवळ २.५ फूट आणि दोन खांबातील अंतर १०० मीटर आहे. . उमरेड जवळ सुद्धा एक खांब दोन वर्षापूर्वी सापडला होता.संशोधना नंतर पुन्हा सापडेल.
गोंड राजांचा इतिहास
नागपूर चे गोंड राजे हे १६ व्या शतकात देवगड चे राजे होते.त्यांचे नाव जाटबा म्हणून होते.पुढे १७ व्या शतका पर्यंत भक्त बुलंद आणि चांद सुलतान होते.
गोंड राजे हे नेहमी इतर राज्यांचे हस्तक राहून राज्य करीत होते. नागपूर चे गोंड राजे चंद्रपूर ला आणि चंद्रपूर चे नागपूर ला येत जात नसत.मात्र चंद्रपूर चे गोंड राजे हे सातत्याने चंद्रपूर,कळंब आणि माहूर येथेच राज्य करीत होते.ते नागपूर येथे कधीच जात येत नसे. नागपूरचे राजे दुसरे होते,त्यामुळे चंद्रपूर चे गोंडराजे ताडोबा,हिंगणघाट, ब्रम्हपुरी ह्या बाजूला जात नसे.विशेष म्हणजे गोंड राजे हे विटांचे बांधकाम करीत नसे ,ते दगडाचे बांधकाम करीत असे.ते चंद्रपूर -ताडोबा नागपूर हा रस्ता ते कधी उपयोगात आणत नसे, ताडोबा च्या तलावाच्या परिसरात जंगलातील आदिवासी राहत होते.त्यांनीच ताडोबा तलावाजवळ तारोबा हे देवस्थान उभे केले .तिथेच कित्येक लाख आणि हजारो वर्षापासून पाशान युगीन मानव राहत असत आणि त्यांची अवजारे आजही माझ्या कडे आहेत.

भोसलेचा इतिहास
कान्होजी भोसले ह्यांनी १७४२ पासून नागपूर येथे राज्य सुरू केले.पुढे १७५५ मध्ये नागपूर ला सत्ता सुरू केली.रघुजी
भोसलेंनी पुणे येथून नागपूर येथे आणि चंद्रपूर येथे आक्रमन करून गोंड राज्यावर १०० वर्षे राज्य केले.चंद्रपूर हे मुधोजी ला देण्यात आले.त्यांनी ३२ वर्षे राज्य केले नंतर मुलगा व्यंकोजीने राज्य केले.त्यांनी बल्लारपूर आणि चंद्रपूर च्या किल्लाची पुनर्बांधणी , तसेच रामाळा तलावाची दुरुस्ती केली.एवढेच नव्हे तर मुरलीधर मंदिर बांधले.विशेष म्हणजे जवळच भोसलेनि स्वतःसाठी राजवाडा सुद्धा बांधला.रघुजीने चंद्रपूर च्या नीलकंठ शहाचा पराभव केला.(१७४८) .नागपूर ते चंद्रपूर येथे सतत यावे लागत असे त्यामुळे त्यांनी नागपूर ते ताडोबा आणि चंद्रपूर येथे येण्यासाठी हा मार्ग निवडला.चंद्रपूर आणि सावली येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सुती वस्तू,कपडे तयार केले जात होते,हा व्यापार नागपूर येथे चालू करावा ह्यासाठी चंद्रपूर – नागपूर रस्ते व्हावे म्हणून भोसलेंनी प्रयत्न केला .लोकांना आणि भोसलेना आणि राजकीय लोकांना रस्ते दिसावे ह्यासाठी दगडी आणि विटा चे खांब उभारले गेले. विशेष म्हणजे भोसले हेच विटांचा वापर करीत असे.इंग्रज आणि गोंड राजे केवळ दगडी इमारती उभारीत असे.इंग्रजांनी भोसलेंच्या अशा विटा वापरावर टीकात्मक लिहित असत.भोसलेंच्या, पुणे,नागपूर आणि चंद्रपूर च्या भागात प्रथमता विटांच्या इमारती सुरू केल्या होत्या.रघुजी भोसले हे वाघ पाहण्या साठी नियमित ताडोबा त येत असे,त्यांनी आधीच आदिवासी वापरात आणलेल्या ताडोबाच्या तलावाची सुधारणा केली होती.आणि विटांची खांब पुढे उभारली होती.पुढे ब्रिटिशांनी रघुजी भोसले-३ ह्यांचा शभर वर्षानंतर पराभव केला होता आणि चंद्रपूर, नागपूर येथे राज्य केले.

ब्रिटिशांचा इतिहास
ब्रिटिशांनी चंद्रपूर जिल्ह्यात १८५४ पासून राज्य सुरू केले आणि १९०० पर्यंत राहिले.रस्ते, रेल्वे आणि रेस्ट हाऊस बांधले, त्यात रस्त्यांमध्ये चंद्रपूर ते नागपूर हे केवळ दोन रस्ते बांधले त्यात एक चंद्रपूर – वरोरा जाम मार्ग तर दुसरा चंद्रपूर – मूल ब्रम्हपुरी हा रस्ता बांधला. चंद्रपूर – ताडोबा – चिमूर नागपूर रस्ता ब्रिटिशांचा नव्हता. ब्रिटिश हे प्रत्येक बांधकामाचे कामकाज आणि निधी ची नोंद ठेवायचे. मी त्यांचे सर्व बिल, पावत्या आणि निवेदन वाचले असून चंद्रपूर – ताडोबा – नागपूर रस्त्याची ,खांबाची कुठेही नोंद नाही. मी वाचल्या प्रमाणे ब्रिटिशांनी केवळ भोसले नि तयार केलेल्या चंद्रपूर ते ताडोबा तलावाच्या रस्त्याला बांधले,ताडोबा तलाव सुधारला आणि तिथे राहण्यासाठी रेस्ट हाऊस बांधले. ब्रिटिश ह्या मार्गे पुढे ताडोबा – चिमूर – नागपूर ला जात नव्हते.त्यामुळे त्यांनी रस्ते खांब बांधले नव्हते.ब्रिटिशांनी देशात अशा खांबाची रस्ते म्हणून कुठेच नोंद केली नाही
ताडोबा तील खांब हे ब्रिटिशांनी बांधले ह्याची माहिती चंद्रपूर गॅझेटियर मध्ये चुकीने दिले गेले असल्याने ते बदलून भोसले ह्यांनी बांधले असा उल्लेख करण्यात यावा अशी मागणी इतिहास अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केली आहे.
——————-
प्रा सुरेश चोपणे
भूशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक, चंद्रपूर
( सदर्भ – चंद्रपूर गुझेटियर, नागपूर गॅझेटियर, गोंड राजांचा इतिहास, नागपूरचे गोंड राजे, भोसलेचा इतिहास, दिल्ली मुस्लिम राजांचा इतिहास)















