
नागपूर – महाविकास आघाडीची आज बैठक झाली याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी Congress काँग्रेस, NCP राष्ट्रवादी काँगेसला अगोदर त्यांनी आपला पक्ष एकसंघ ठेवावा, त्यानंतर मग तीन पक्षाची मूठ बांधावी असा सबुरीचा सल्ला दिला आहे.आज विविध विकास कामांच्या भूमिपूजन निमित्त त्यांचे नाशिक येथील नागपुरात आगमन झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नागपुर मनपा विकास कामे केवळ महापालिका निवडणूक असो किंवा नसो, आमचे बाराही महिने काम सुरूच असते. त्यामुळे निवडणुकांचा आणि कामाचा काही संबंध नाही असे फडणवीस म्हणाले.
बँक घोटाळा प्रकरणी छेडले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या माहितीनुसार या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात होती. त्यानंतर सगळ्या केसेस ट्रान्सफर झाल्या होत्या, प्रायव्हेट पिटिशनल सुप्रीम कोर्टात गेले होते की, याची सुनावणी सुप्रीम कोर्टात गेले होते की. याची सुनावणी पूर्वी झाली असल्यामुळे उर्वरित निकालाची जी स्टेज आहे, याची पुन्हा सुरूवात केली तर अजून सात आठ वर्ष यांचा निकाल येणार नाही म्हणून पून्हा सुप्रीम कोर्टाने पुन्हा हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी नागपुर कोर्टात दिले आहे, त्यामुळे लवकर निकाल होईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, लव जिहाद कायदा संदर्भात नीतेश राणे यांनी मोर्चा काढला.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या कायद्याची मागणी आहे. अलिकडच्या काळात महाराष्ट्रात आपली ओळख लपवून लग्न करायचे, धर्मांतरण करायचे अशा प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात बाहेर देखील आल्या आहेत. म्हणून त्या संदर्भात सर्वच ठिकाणाहून कायदा केला पाहिजे अशा प्रकारची मागणी होत आहे. यासंदर्भात मी स्वतः सभागृहात मागच्या वेळेस घोषित केले होते की, वेगवेगळ्या राज्याच्या कायद्याचा आम्ही अभ्यास करत आहोत, त्यानंतर महाराष्ट्रात आम्ही याबाबतीत निर्णय करु तो अभ्यास सुरू आहे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञा वापरा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-सीआयआय परिषदेत उपस्थिती
नागपूर – ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा बदल शक्य झाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सीआयआयतर्फे ‘विदर्भ आयटी कॉनक्लेव्ह’चे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्थेत करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, सीआयआयचे महाराष्ट्र अध्यक्ष डॅा. नंदकुमार उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली आहे. महाराष्ट्राने जीएसटी संकलनात अव्वल स्थान गाठले आहे. 2.7 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन यंदा राज्यात झाले आहे. देशाच्या एकूण संकलनात हे प्रमाण 15 टक्के आहे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॅालर्सपर्यंत विकसित करण्याचे ठरविले आहे. हे ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राचाही वाटा असण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राज्याची अर्थव्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने एन.चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये प्रसिद्ध उद्योजकांचा समावेश आहे. ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास कसे नेता येईल, यासाठी सर्वांगाने प्रयत्न करण्यात येत आहे.
नागपुरात नवीन विमानतळाच्या कामकाजाला लवकरच सुरुवात होईल. दोन धावपट्ट्या आणि देखणे पॅसेंजर आणि कार्गो टर्मिनल असेल. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हब’ नागपुरात झाल्यास शासनाचा पाठिंबा असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.