नागपुरात महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन (नागपूर-विदर्भ प्रांत)

0

नागपूर –मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूना आध्यात्मिक बळ देणारी ही भारतीय मंदिर सस्कृती आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्यावर महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन (नागपूर-विदर्भ प्रांत) भर दिला गेला. मंदिरातील पैसा धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे मंदिरांचे रक्षण, जतन, संवर्धन करण्यासाठी आणि मंदिर विश्वस्ताचे संघटन सशक्त होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्रीराम मंदिर, राम नगर, श्री गणेश मंदिर टेकडी, संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, बेल्लोरी, श्री गुरु बृहस्पती मंदिर, कान्होलीबारा यांच्या सयुक्त विद्यमाने रविवार 4 फेबूवारी रोजी श्रीराम सभागृह, राम नगर, नागपूर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन (नागपूर-विदर्भ प्रांत) आयोजन करण्यात आले .

यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नागपूर जिल्हा निमंत्रक दिलीप कुकडे नागपूर तसेच विदर्भाच्या अन्य जिल्ह्यातुन २५० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मदिराच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी झाले होते. प्रामुख्याने महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट, प्रदीप तेंडुलकर- अध्यक्ष, जीवदानी माता मंदिर, विरार, गणेश कवडे- अध्यक्ष, विघ्नहर अष्टविनायक मंदिर, ओझर, दिलीप देशमुख- माजी धर्मादाय आयुक्त, पू. रामज्ञानिदास महात्यागी- महात्यागी सेवा संस्थान, तिरखेडी, पू. भागीरथी महाराज- गुरुकृपा सेवा आश्रम, सर्पिधाम, बेलतरोडी आदी मान्यवर सहभागी होतेयावेळी सुनील घनवट- समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दिलीप कुकडे नागपूर जिल्हा निमत्रक महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि अध्यक्ष संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर बेल्लोरी, अधिवक्ता ललित सगदेव- विश्वस्त प्राचीन शिवमंदिर मानकापूर, महादेवराव दमाहे- उपाध्यक्ष हिल टॉप दुर्गा माता मंदिर, प्रदीप पांडे गुरुजी प्रमुख पुजारी हिल टॉप दुर्गा माता मंदिर प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिवेशनात विविध विषयावर वक्त्याचे मार्गदर्शन तसेच मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे झाली . यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय,मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी, दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली. दुसरी राज्यस्तरीय परिषद ओझर अष्टविनायक येथे घेण्यात आली. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात केवळ 6 महिन्यांत 414 हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली हे विशेष.

 

नाश्त्यात झटपट बनवा बाजरीची लापशी | Shankhnaad News #shankhnaadnews #live